शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

वाळवा-शिराळ्यात ‘स्वाभिमानी’ची पुनर्बांधणी : शेतकरी नेत्यांमधील संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 23:52 IST

इस्लामपूर : राज्यातील शेतकरी चळवळीला पुन्हा धार आणण्यासाठी खासदार राजू शेट्टी यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांशी संपर्क वाढवला आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यारुपाने

ठळक मुद्दे सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेचे नव्याचे नऊ दिवस

अशोक पाटील ।इस्लामपूर : राज्यातील शेतकरी चळवळीला पुन्हा धार आणण्यासाठी खासदार राजू शेट्टी यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांशी संपर्क वाढवला आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यारुपाने गेलेली ताकद पुन्हा मिळविण्यासाठी शेट्टी यांनी वाळवा व शिराळा तालुक्यात संघटनेची पुनर्बांधणी सुरु केली आहे. याउलट घाईघाईने स्थापन केलेल्या रयत क्रांती संघटनेची अवस्था नव्याचे नऊ दिवस या म्हणीप्रमाणे झाली आहे.हातकणंगले लोकसभा मतदार संघाचा इस्लामपूर-शिराळा मतदार संघ केंद्रबिंदू आहे. गत निवडणुकीत आघाडी काँग्रेसकडून या मतदार संघाची धुरा आमदार जयंत पाटील यांच्यावर होती. आगामी निवडणुकीत राजू शेट्टी हे काँग्रेस आघाडीच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे जयंत पाटील हे टेन्शन फ्री दिसत आहेत. त्यांनी शेट्टी यांच्या भूमिकेविषयी बोलणे टाळले आहे.शेट्टी यांनी आपला शत्रू भाजप (सदा) मानूनच आपली वाटचाल सुरु केली आहे. स्वाभिमानीतून बाहेर पडलेल्या कार्यकर्त्यांची पुन्हा जुळवाजुळवही सुरु केली आहे. स्वगृही परतलेल्या सयाजी मोरे यांना शेट्टी यांनी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्षपद दिले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी झाल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी संघटनेची स्थापना केली.पहिलीच सभा त्यांनी शेट्टी यांचा बालेकिल्ला असलेल्या हातकणंगले येथे, तर जयसिंगपूरमध्ये भव्य शेतकरी मेळावा घेऊन त्यांच्यासमोर आव्हान निर्माण केले होते. प्रत्येक जिल्ह्यात कार्यकारिणी जाहीर केली. संघटनेचे नव्याचे नऊ दिवस झाले असतानाच खोत यांनी ‘मी भाजपचाच’ असे सांगून आपली खरी ताकद ही भाजप असल्याचेच अप्रत्यक्षपणे स्वत:हून स्पष्ट केले. 

रयत क्रांती संघटना राजकीय पक्ष नाही. समाजातील विविध घटकांची समस्या सोडविण्याचे काम ही संघटना करते. विधानपरिषदेसाठी सदाभाऊ खोत यांनी अर्ज करताना भाजपचा एबी फॉर्म भरला होता. त्याचा विपर्यास प्रसारमाध्यमांनी केला आहे.- सागर खोत, युवा ने ते,रयत क्रांती संघटना.

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत Raju Shettyराजू शेट्टीSangliसांगली